नमस्कार ,जीवनाच्या वाटेवर चालत असताना आपल्या प्रत्येकाच्याच मनाला अनेक विचार ,भावना, कल्पना यांचं चक्र सुरू असतं माणूस हा ते वेगवेगळ्या पद्धतीने समाजात मांडत असतो.हे विश्व पूर्णच एक रंगमंच आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही त्या रंगमंचावर कला सादर करणारी कलाकार आहे. कविता ही मानवी मनाच्या स्थितीच स्वरूप प्रकट करते, ती मनाच्या आतून डोळ्यांना दिसणाऱ्या, तर कधी कल्पनांच्या जगतात जाऊन सत्यात हवे असणारे ध्येय साध्य करते .
कविता म्हणजे जणू देवळातल्या देवांना लागलेला गंध- जसं माणसाच्या मनातील सुख-दुःख आनंद यांचा अचूक ठाव घेणारी आणि दमलेल्या मनाला सुखद चाहूल देणारी असते ती कविता . मी सुद्धा अगदी सहज शब्दांमध्ये जे सुचलं ते लिहिलं अशा आशयाने काही कविता तुमच्या समोर सादर करीत आहे. तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा मला मिळाव्यात .
धन्यवाद .
मकरंद दादा....